Categories
Misc Write Ups and Downs

साधे प्रश्न:नोट बंदी

​नोटा बंदी वर सगळे वाचून,बोलून झाले असेल तर हे वाचा….
तर,सरकार ला काळा पैसा संपवायचा होता.जमले तर काळी संपत्ती पण संपवायची होती.सरकारला खरेच हे असेच करायचे होते का?झालेे का ?वगैरे बोलून झालें असेलच.अशी कृती करण्याचा ह्या सरकारचा तो हक्क आहे, हे समजून आपण बरेच वाद स्थगित करू शकतो.त्याचे बरे वाईट काय ते काळ बघेलच.
प्रश्न आहे तो आपल्या कृती चा,समजे चा.काळा पैसा हा काळा असतो तो त्याच्या नैतिकते मुळे. म्हणजे सरकार दरबारी त्याची डायरेक्ट नोंद नसते .मग त्यावर टॅक्स पण मिळत नाही,म्हणून काळा. हे काळा पैसे जमावणारे अतिरेकी वगैरे असतात ,हे terrorism चे KG1 स्वरूप होईल,असो.मग?..सरकारी भाषेत हे लोक भ्रष्टचारी असतात.हो सरकार लोकांवर खर्च करू शकणारा पैसे हे लोक दाबून ठेवतात,टॅक्स देत नाही त्यावर.कमी टॅक्स मुळे जनतेचं कमी प्रमाणात भले होते.चूकचे आहे ते,….मी हे अगदी सध्या भाषेत मांडले . टॅक्स नाही आला तर सरकार खर्च कसा करणार,लोकशाहीची रचना तशीच असते.लोकांनी टॅक्स देऊन थोडा त्रास सहन करायचा आणि सरकार तो टॅक्स इतर जागी त्यांच्या भल्या साठी वापरून त्याची भरपाई करेल.

मग मला सांगा,सरकारने काळा पैसा संपवला ते बरे केले,हे ठीक,आपण ते समजून घेतले ते पण ठीक .पण ते त्यांचे आणि आपले कर्तव्य नाही का? 

इथे देशभक्तीचा काय संबंध?तुम्ही कितीही त्रास सहन करून ब्यांकेच्या रांगेत लागला असला तरी ते कर्तव्य पूर्ण केले असेच आहे ,नागरिक म्हणून .त्याग आणि भक्ती ह्याला जागा नाही ह्या कार्यक्रमात.फारतर काळ्या पैसे वाल्यांची कशी ठेचली हा आनंद साजरा करू शकतो आपण,खरे खोटे देव जाणो.

चला मग,टॅक्स चोरीचा पैसे परत आला,काय तो थोडा जास्त असेल,पण आला,सदाचारी लोकांची अधिक भले करेल सरकार . मग टॅक्स म्हणून जो पैसे आजपर्यंत येत होता,येत आहे,त्याचे काय? हा पैसा ह्या परत आलेल्या काळ्या पैश्या पेक्षा जास्त आहे,असतो. त्याने लोकांचं मस्त भलं होतंय असे मानतो का आपण.देश चालतो कि नाही असे विचारत नाही मी,तो चालतोय,नाही तर लोक रस्त्यावर उतरून क्रांती करतात.भलं होतंय का? ते विचारतोय.. व्हायला पाहिजे तसे आणि तेवढे भले होते आहे का?

तुमचा सरकारी व्यवस्थे बद्दल चा अनुभव काय म्हणतो? तोच कॉमन मॅन ला येतो ,तोच अनुभव …

म्हणजे ब्यांकेच्या रांगेत लागून,paytm चा प्रचार करून,सरकार बरोबर(च) कसे आहे(च) सांगताना आपण तो देशभक्ती चा जो जोर दाखवतो,त्याला साजेल असा अनुभव असलेली व्यवस्था देते का?

मग हा नोटा मुळे आलेला,नागरिकशास्त्राचा जोर,तिथे वापरता येईल का? म्हणजे तलाठी ऑफिसात,rto, घर खरेदी आणि हो टोल नाके. एकवेळ तुम्ही एकटे हे  करतहि असाल.बरेच लोक ऍक्टिव्ह आहेत आजकाल.पण ही संख्या आणि ब्यांकेच्या रांगेत लागून देशभक्ती होते हे फॉरवर्ड करून संगणाऱ्यांची संख्या, जुळते का हो?

नाहीच जुळत,खूप मोटठी तफावत आहे.

उगाच मोदी मधात आणू नका,सरकार ला हा हक्क-संधी आहे हे आपण आधीच मान्य केले.

प्रश्न आहे तो,आपल्या नागरिक जबाबदारी आणि देशभक्ती च्या कल्पना उथळ आहेत का ह्याचा? का सहजपणे खेळवले जातोय आपण?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.